श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्पर्शाने पावन झालेला व निसर्गसमृद्धीचे वरदान लाभलेला आपला सह्याद्री . ह्या सह्याद्रीची वनसंपत्ती व जैवविविधता आज धोक्यात आहे . प्रदूषण, मानव - निर्मित आगी या मुळे ही निसर्ग संपदा लोप पावत चालली आहे. हे थांबवूया ! या निसर्गाच्या वारशाचे जतन करून, त्या आधारे शाश्वत रोजगार निर्मिती करू .
ह्यासाठी आम्ही हाती घेत आहोत ही महत्वाकांक्षी मोहीम -
' Mission Sahyadri '



" Mission Sahyadri " ही एक मोहीम आहे, आणि हे एकट्या-दुकट्याचे काम नाही. जेंव्हा शेतकरी, सुजाण नागरिक, सहकारी संस्था, खासगी कंपन्या, व सरकारी यंत्रणा एकत्र कामाला लागेल, तेव्हाच या मोहिमेला यश येईल. आपल्याला या साठी प्रचंड मनुष्यबळ, कौशल्य, नव-नवीन कल्पना, तसेच पैश्याची गरज भासणार आहे. आम्हाला समाजातील सर्व घटकांचा सहभाग यात अपेक्षित आहे.
तुम्हाला जर या उपक्रमात कोणत्याही प्रकारे सहभागी व्हायचं असेल, तर आमच्या टीम शी संपर्क करा.